रुसलेल्या पावसात .. सैर घाटवाटांची !

15 comments:
उकाडा जाणवतोय फार. उंबरठा ओलांडून घराबाहेर पडावं तर दिवाकरराव सकाळी सकाळीच सुरू होतात. स्वच्छ सूर्यप्रकाश पण डोळ्यांना असह्य होणारा,आता नकोसा झालाय. वर निळ्या आकाशी एखाद कापशी ढग वरुणराजाची आठवण देऊन जातोय. कधी येतोय रे पावसा, अश्या विनवण्या करीत मुके जीवही झाडांच्या सावलीत विसावतायेत. आम्हा भटक्यांच्या भटकंतीलाही  जरा विराम लागलाय. पण त्याही परिस्थितीत मन काही रमेना. मग डोक्यात मस्त प्लॅन शिजायला लागतो, घनदाट अरण्याची वाट खूणावते. मन सैरावैरा धावू लागतं वाट अंधारबनाची. मग मजाच मजा बाहेर आग ओकणाऱ्या दिवाकराला वाकुल्या दाखवत सह्याद्रीच्या कुशीत शिरण्याची. मग त्याला उगाच चिडवत भटकत राहण्याची,तुला काय वाटलं ? आम्ही घरात बसणार ? नाहीरे, नारायणा नाही. तुझ्या नाकावर टीचुन डोंगरात जाणार.
मढे घाटाचा धबधबा