गड आला पण सिंह गेला ...............!

2 comments:

गड आला पण सिंह गेला ...............!


हे वाक्य सर्व महाराष्ट्रियानी एकदा तरी ऐकलेच  असेल… (नसेल ऐकले तर  पुढे वाचू  नका ............. :) )

सिंहगड वाचावताना  तानाजी मालुसरेंचा मृत्यु  झाला  हे ऐकल्यावर शिवाजी महाराजांच्या तोंडी आलेले हे वाक्य ..

सुट्टीच्या  लोह्गड  चा बेत फसल्यावर सिंहगड ला जायचे ठरले .  बाहेर छान पाउस  पडत होताच ..
सिंहगड ला जाणे  सर्वात सोपे असावे  , बस  , जीप , इत्यादी बरेच मार्ग आहेत .

चढायच असल्यास मार्ग दूसरा आहे ..साधारण ४५ मिनट मधे आपण हा गड  चढू शकतो शकतो (सरासरी)

 गडावर अजुन पाय ठेवतोच तोवर घरून फ़ोन .. वर्तमान पत्रा  मधे बातमी आली आहे ..एक मुलगी फोटो काढ़ायसाठी  पोज  देताना धुक्याचा अंदाज न आल्यामुळे खोल दरीत पडली ...शोध पथक  शोध घेत आहेत .. नागरिकाना  जपून  फिरण्याचे  आवाहन .

आम्हाला समजुन चुकले की घरी जाईपर्यन्त सिंहगड आणि आजकालच्या पीढ़ी चे  ऐकून न घेण्याची तयारी  यावर चर्चासत्र(?) चालू राहणार :) :)

असो ..............

सिंहगड म्हणजेच आपला कोंढ़ाणा ..

पूर्वी अदीलशाही मधे असलेला हा किल्ला सुभेदार म्हणून असलेल्या दादाजी कोंड देवांच्या  ताब्यात होता ..त्यांच्या  मृत्यु नंतर किल्ल्याच्या किल्लेदार सिद्धि  अम्बर याला लाच देऊन शिवाजी महाराजानी स्वराज्यात आणला  व  आपले लश्करी केंद्र बनवले ..

पण इ स  १६४९  मधे शहाजी राजांच्या सुटकेसाठी  त्याना तो परत अदीलशहा ला द्यावा लागला ..

सिंहगड प्रसिद्ध अहे तो मुख्यत्वे तानाजी मालुसरेंच्या बलिदाना साठी ..महाराज जेव्हा  आग्र्या वरून परत आले  तेव्हा त्यानी सर्व किल्ले परत ताब्यात घेण्यास सुरुवात केली  तेव्हा तानाजी ने त्याना कोंढाणा मिल्वुन द्यायचे कबुल केले.

कबुल केल्याप्रमाणे त्यानी गड़ मिळवून  दिला पण त्यांचा मृत्यु झाला ....

हा   झाला पुर्वीचा सिंहगड .... सध्याच्या सिन्ह्गडा कड़े कोणी ऐतिहासिक स्थळ  म्हणून पाहत नाही .. full commercial ......anyways...

ही झाली ऐतिहासिक बाजु ..

सध्याचा सिंहगड : - १ ५  ऑगस्त २००८    पासून  आसपास टोल  घ्यायला सरकार ने सुरुवात केली . २०१० पर्यन्त तरी गडावर कहिहि  सुधारणा दिसली नाही  ,..( जमा रक्कम : ६५  लक्ष )
पावसाळ्या  मधे सिंहगड म्हणजे एक refreshment.,.....................must go once in an year during mansoon /heavy rain :)
गडाला   २ दरवाजे आहेत .. एक आहे कल्याण दरवाजा  आणि एक पुणे दरवाजा ..




 

  

   गडावरील पाहण्याची ठिकाणे :
 
  दारूचे कोठार :- दरवाज्यातून आतमधे  प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची दगडी ईमारत म्हणजेच दारूचे                               कोठार .
  देव  टाक्या : तानाजी स्मारकाच्या मागे डाव्या एक छोटा तलाव आहे ..त्याच्या डाव्या बाजूला गेल्यास          देव टाक्या दिसतील  
   कोंढाणे श्वर मंदिर :  शंकराचे प्राचीन मंदिर।
 
 अमृतेश्वर भैरव मंदिर : भैरव व भैरवी च्या मुर्त्या आहेत ..

खालील फोटो २ वेगळ्या ट्रेक मधे घेतलेले आहेत :)


दुरचित्र वाणी चा प्रसिद्ध खाम्ब



 
 
 






दरवाजा ...........






सिंहगड मान्सून  मधे ......



 



वरील  फोटोची उन्हाळी आवृत्ती  :) :)







राज सिनेमा मधील दृश्य वाटत आहे :)






तानाजी  मालुसरे स्मारक 


 





खाण्याची व्यवस्था :  या बाबतीत सिन्ह्गडाचा  हात कुठलाच गड धरु शकणार नाही ...
गरम गरम पिठले भाकरी , कांदा भजी अणि मडक्यातले दही ...........बरेच लोक केवळ  हे खाण्यासाठी सुद्धा सिन्हगडाला  आवर्जुन भेट देतात .....






 त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात  एकदा तरी सिंहगडाला  नक्की भेट द्यावी :) :) :)